एसटी संपाची दाहकता व सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम
एसटी संपाची दाहकता व सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम
श्रीरामपूर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पासून बेमुदत संप सुरू आहे. या संपात ७६ हजार ७६५ कर्मचारी सहभागी असून राजकीय पक्ष, विविध संघटना, कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबातील सदस्य संपाला पाठींबा देतानी आपण पाहिले आहे. या एसटी कर्मचारी संपामुळे मागील अनेक दिवसापासून बसस्थानकावर बसेस अक्षरशः उभ्या असून प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. एकूणच सामाजिक जीवनावर व आर्थिक उलाढालीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून आला. त्याचबरोबर काही ग्रामीण व आदिवासी भागात प्रवासासाठी खाजगी बससेवा, रिक्षा किंवा इतर पर्यायी वाहतुकीचे साधन नसल्याने तिथे संपाची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवली.
ऐन दिवाळीतच संप झाल्याने शहरातील बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या बससेवा बंद असल्याने याचा विपरीत परिणाम व्यापारी वर्गाला झाला. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या सारख्या मोठ्या शहरातील प्रवाशांना रेल्वे, खाजगी बस वाहनांनी प्रवास करावा लागला. अशातच एसटी महामंडळ जर दीडशे ते दोनशे रुपये आकारत असेल तर खाजगी वाहतूकधारक तीनशे ते चारशे रुपये आकारू राहिले. या भाडेवाढमुळे महाविद्यालयीन बसपास धारक विद्यार्थी, सर्विस पासधारक, सामान्य प्रवासी यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे.
तसेच कोरोनाकाळानंतर शाळा, महाविद्यालय आता सुरु झाली आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची एसटी अभावी हाल होत असून त्यांचा शिक्षणावर मोठे नुकसान होताना दिसत आहे. एसटी बस मुळे विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहचता येते. कोरोनामुळे आधीच दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. शाळा सुरु होऊन बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुंबईत आझाद मैदानावर कर्मचारी तळ ठोकून होते. संपाचे नेतृत्व करणारे अध्यक्ष व परिवहन मंत्री यांचे अनेकवेळा बैठका झाल्या तरी देखील काही तोडगा निघाला नाही. जेव्हा सरकारने बऱ्याच कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस, निलंबित, बडतर्फ अशा प्रकारचे कारवाई केली तेव्हा संपामधून काही कर्मचार्यांनी माघार घेतली. तरी देखील बरेच कर्मचारी संपावर आहे. त्यामुळे काही ठिकाणी बससेवा बंद आहे.हजारो व्यवसायिक आणि व्यापारी वर्ग बाजारपेठेच्या ठिकाणी जाऊन आपला व्यवसाय करतात. ज्या गावात बाजार आहे त्या दिवशी विशेष जादा एसटी बसेस सोडल्या जातात. तसेच ग्रामीण भागातून शहरात दैनदिन वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी कमी झाल्यामुळे शहरातील बाजारपेठेवर याचा परिणाम दिसू लागला
जेवढा विश्वास सामान्य माणसाचा एसटीवर आहे. तेवढा विश्वास खाजगी वाहनावर नाही. कारण एसटीचा प्रवास हा सुरक्षित, वेळेत व आरोग्याचा दृष्टीने सोयीस्कर होतो. तसे पाहता खाजगी वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवतात त्यामुळे गर्दीला सामोरे जावून कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारास सामोरे जावे लागते.
लाखो सर्वसामान्य नागरिकांची हीच अपेक्षा आहे की, लवकरात लवकर शासनाने यावर काही तोडगा काढावा. व बससेवा पहिल्या सारखीच सुरु करावी.