*उन्हाळ्यात पक्षांची अन्न व पाण्यासाठीची भटंकती थांबविण्यासाठी येवला येथील मातोश्री तंत्रनिकेतनचा पुढाकार*
*उन्हाळ्यात पक्षांची अन्न व पाण्यासाठीची भटंकती थांबविण्यासाठी येवला येथील मातोश्री तंत्रनिकेतनचा पुढाकार*
येवला प्रतिनिधी- पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते. पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा विचार पुढे आला आणि त्या संदर्भात मातोश्री तंत्रनिकेतन धानोरे येवला येथे पक्ष्यांकरिता फिडर स्थापित करण्यात आले संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री रुपेशभाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गुजराथी सर यांच्या कल्पनेतून स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपक्रम राबविला.
“पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे श्री. साईसार्थक तडाखे सर यांनी संगितले
सदर प्रसंगी बाळासाहेब तांबे सर , सोमनाथ गाढे सर, नितीन गुजर सर , संदीप कोल्हे सर, साईसार्थक तडाखे सर, महेश गावंड सर, रवींद्र शिंदे सर आदी सर्व उपस्थित होते.