दिवगंत आण्णासो चावदस केदार यांच्या स्मरणार्थ काव्य स्पर्धेचे आयोजन

दिवगंत आण्णासो चावदस केदार यांच्या स्मरणार्थ काव्य स्पर्धेचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी – खान्देश साहित्य संघ महा .राज्य शाखा सुरत यांच्या वतीने दिवंगत आण्णासो चावदस भिवा केदार सेवा निवृत्त व्यवस्थापक महावितरण विभाग धरणगांव जि जळगाव या प्रथम पुण्यस्मरणार्थ दि २०/७/२०२१ ते २५/७/२०२१ पर्यंत भव्य राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
त्यात मोहन पाटील कवळीथकर प्रथम क्रांती कैलास पाटील वाई सातारा व्दितिय कैलास संतोष भामरे तृतिय आणि यशवंत त्र्यंबक पगारे व माधुरी मगर काकडे हे उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यशस्वी झालेत
या विजेत्यांना अनुक्रमे १०५१, ७५१, ५५१ व उत्तेजनार्थ ३५० असे रोख बक्षीस सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देवून एका कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन खान्देश साहित्य संघ सुरत शाखेचे अध्यक्ष जितेंद्र कपुरचंद बहारे यांनी केले होते
खान्देश साहीत्य संघाचे संस्थापक व राज्याध्यक्ष प्रा सदाशिव सुर्यवंशी तसेच खान्दे साहित्य संघाचे सचिव व वाणगी या आहिराणी मासिकाचे संपादक आप्पासो रमेश बोरसे तसेच स्पर्धेस लाभलेले परीक्षक प्रा आप्पासो शिवाजी साळूंखे व श्री प्रकाश पाटील पिंगळवाडेकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे सदर स्पर्धेत महाराष्ट्र व शेजारील राज्यातील एकूण ६७ कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला होता संकलनाचे काम जयराम मोरे सोनगीर यांनी पार पाडले.