मतदार संघातील राहता तालुक्यातील ११ गावातील रस्ते, पाणी, वीज आदी समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध – कोल्हे
मतदार संघातील राहता तालुक्यातील ११ गावातील रस्ते, पाणी, वीज आदी समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध – कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव मतदार संघातील राहता तालुक्यातील 11 गावांमध्ये संपर्क अभियान राबवून गावातील रस्ते पाणी वीज आदी समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू या गावातील राहिलेला विकासाचा अनुशेष भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे भरून काढू असा सार्थ विश्वास जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.पुणतांबा व परिसरातील अकरा गावातील नूतन सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सदस्यांचा सत्कार रविवारी पुणतांबा परिसरातील सप्तपदी लॉन्स येथे विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते. यावेळी व्यासपीठावर धनंजय जाधव भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे शिवाजी लहारे चंद्रभान धनवटे किसन बोरबने साहेबराव शिंदे विक्रम वाघ जयवंत शिंदे राजेंद्र लाहारे सर्जेराव जाधव बलराज धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी युवक नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोसायटी संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.श्री विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदारसंघातील राहाता तालुक्यातील 11 गावे अडीच वर्षाच्या काळात विकासापासून वंचित राहिली माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आमदारकीच्या काळात या भागात विकास पर्व सुरू केलं होतं मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करून स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम फक्त केलं मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे या मतदारसंघाच्या विकास कामाला चालना मिळणार आहे. रस्ते पाणी वीज यासह प्रलंबित समस्या सोडवण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांच्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणूक करणे हे आमचे कर्तव्य असून सर्वांना बरोबर घेऊन विकास साधू असे विवेक कोल्हे यांनी सांगितले पुणतांबा व परिसरातील 11 गावांमध्ये विशेष संपर्क अभियान राबवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून मतदारसंघातील शेतीचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.सध्याच्या लोकप्रतिनिधींनी दारणा धरणातून शेजारच्या येवला तालुक्यातील ४० गावांना पाणी दिले, त्याबाबत कुणी आवाज उठवला नाही गप्प बसण्याची भूमिका घेतली हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याला मिळते हे आपले दुर्दैव असल्याचे कोल्हे यांनी सांगून अप्रत्यक्षपणे आमदार आशुतोष काळे यांच्यावर टीका केली.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या स्थापनेपासून इतिहासात प्रथमच कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी प्रयत्न केले त्याबद्दल पुणतांबा परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव केला.
युवा नेते विवेक कोल्हे यांची कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणतांबा पंचक्रोशीतील गावांच्या वतीने सत्कार करण्यात आला.श्री. धनंजय जाधव यांनी अकरा गावातील समस्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्याची मागणी केली तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे यांनी या अकरा गावात पक्षाचे काम वाढवण्यासाठी प्रयत्न करून भाजपचे काम तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.श्री. महेंद्र चौधरी, संपत चौधरी, सुधाकर जाधव, अशोक धनवटे, ज्ञानदेव शेळके, सुनील कुरकुटे, विवेक साबदे, अहमदनगर जिल्हा दिवांग सेलचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, दत्तात्रय वहाडणे, दिनकर भोरकडे, रामदास बोरबने, रामपूर वाडीचे सरपंच संदीप सुरडकर, बबन काळे, सुभाष सांबारे, बापूसाहेब गोरे, सुभाष साबदे, जयवंत शिंदे, संभाजी गमे, सोपान धनवटे, ज्ञानदेव धनवटे, साहेबराव बनकर, मधुकर जगदाळे, भाऊसाहेब जेजुरकर प्रणित शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी केले.