काय ते खड्डे, काय ते पाणी, काय तो चिखल; ब्राम्हणगाव बदापूर रस्त्याची अशीच स्थिती!
*काय ते खड्डे, काय ते पाणी, काय तो चिखल; ब्राम्हणगाव बदापूर रस्त्याची अशीच स्थिती!*
कोपरगाव प्रतिनिधी- सध्या ग्रामीण आणि शहरी रस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम जोरात सुरू आहे. रस्त्यांअभावी नागरिकांची होणारी गैरसोय टळावी हा या मागील उद्देश आहे.मात्र ब्राम्हणगाव ते बदापूर हा अंदाजे ५ ते ६ किमीचा रस्ता म्हणजे या मार्गावरील वाहन चालकांसाठी चांगलाच डोकेदुखीचा ठरत आहे एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या मार्गाने नेत असतांना तो रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहचेल किवा नाही याबाबत शंकाच आहे.
या रस्त्याला गेल्या कितेक वर्षापासून या रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कितेक वेळा निवेदन दिले आहे पण बराच कालावधी लोेटूनही सदर रस्ता मंजूर होऊ शकला नाही तरी प्रशासनानी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता मंजूर करून पुर्ण करावा अशी स्थानिक नागरिकानी विनंती केली.
यावेळी युवा नेते अनुराग येवले, भागवत वाकचौरे, सूर्यभान वाकचौरे, अशोक आहेर ,आण्णा हारदे, सिताराम जाधव अशोक वाकचौरे, मच्छिंद्र आहेर, गणेश आहेर ,गणेश सोनवणे ,पांडुरंग आहेर, राजेंद्र हारदे ,विठ्ठल आहेर, गोरख हारदे ,राजेंद्र जाधव, सचिन हारदे, विठ्ठल डोळे ,सर्जेराव वाघ, रोहित वाकचौरे ,लक्ष्मण सोनवणे, शिवाजी सोनवणे ,अजय आहेर, सहज वाकचौरे, शिवाजी आहेर, भागवत आहेर, बाबासाहेब जाधव, हरिचंद्र दंवगे, गणेश लेभे ,विलास अनर्थे, प्रकाश सोनवणे ,रामकिसन दरेकर, तुकाराम आसने, जालिंदर आहेर, योगेश आहेर ,जयराम अनर्थे सचिन जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.