सौ.वैशालीताई प्रमोद आभाळे यांना “क्षितीजा महीला सन्मान पुरस्कार”प्रदान…
सौ.वैशालीताई प्रमोद आभाळे यांना “क्षितीजा महीला सन्मान पुरस्कार”प्रदान...
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द च्या माजी सरपंच सौ.वैशालीताई प्रमोद आभाळे यांना *उमंग महीला फाउंडेशन, नाशिक* यांच्या वतीने दिला जाणारा *क्षितीजा महीला सन्मान* हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा दि.८ जानेवारी रोजी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे झालेला असला तरी उमंग च्या अध्यक्षा सौ.विद्या सागर आहेर यांनी *सौ.वैशालीताई आभाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना सदर बाब कोपरगाव तालुक्यातील माध्यमांना कळविली आहे* या सोहळ्यामध्ये *माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार* तसेच *संगमनेर च्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे,मुंबई एज्युकेशन ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.मिनाताई छगन भुजबळ व ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदा राजेंद्र पवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले*
हा पुरस्कार सोहळा *सौ.शोभाताई जयप्रकाश छाजेड* यांच्या अध्यक्षतेखाली, *स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील राणु आक्का अश्विनी महांगडे* यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सौ.वैशालीताई आभाळे या सध्या *कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा तथा मढी खुर्द च्या माजी सरपंच आहेत* या दोन्ही क्षेत्रात त्याचे काम उल्लेखनीय आहे.*या पुरस्काराबद्दल कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकदादा काळे,श्री.साईबाबा विश्वस्तव्यवस्था अध्यक्ष तथा विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे, प्रियदर्शनी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे,सौ.चैतालीताई आशुतोषदादा काळे व मढी खुर्द च्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे*