करंजी येथील चौरंगीनाथ यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
करंजी येथील चौरंगीनाथ यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
कोपरगाव शहर प्रतिनिधी- करंजी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान श्री चौरंगीनाथ महाराजांच्या अक्षयतृतीया पासून सुरू होणाऱ्या यात्रेचा परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या शुभदिनी गावातील जेष्ठ श्रेष्ठ सर्व धर्मियांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करत सर्वानुमते यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी अजय भिंगारे, उपाध्यक्षपदी निलेश येवले, सचिवपदी योगेश शिंदे, सह-सचिव हर्षल आगवन तर सेक्रेटरी पदी आकाश भिंगारे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष संतोष भिंगारे, तसेच सदस्य रवींद्र आगवन, देविदास भिंगारे, संजय आगवन, अनिल डोखे, सांडूभाई पठाण, डॉ सुनील देसाई, चांगदेव आगवन, अरुण भिंगारे, गणेश भिंगारे, अंबादास आगवन, दादासाहेब भिंगारे,संतोष आगवन,दशरथ कुहिले, भगवंता भिंगारे, वाल्मिक भिंगारे, राजू शेख, दादासाहेब जोर्वेकर, अनिल शिंदे, भाऊसाहेब शिंदे, नामदेव भिंगारे, अल्ताफ इनामदार, सुनील जाधव, आयुब शेख, मधुकर काजळे, सोमनाथ काकडे, गणेश मच्छिंद्र भिंगारे, दिलीप शिंदे, जनार्दन बोर्डे, विलास शिंदे, गोरखनाथ भिंगारे, अप्पासाहेब भिंगारे, रघुनाथ भिंगारे, लक्ष्मण शेळके, कृष्णा शहाणे आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करंजी पंचक्रोशीतील जागृत सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री चांदवलीबाबा चौरंगीनाथ यात्रा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून अक्षयतृतीयेच्या दिवशी मोठ्या उत्साहात संपूर्ण गावात भव्य लाईटची रोषणाई करत गाव अगदी फुलून गेलेला असतो त्या सोबतच पारंपरिक खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा,भव्य संदल मिरवणूक तसेच संपूर्ण गावात विविध खेळण्याचे, खाण्याचे, कपड्याचे आदी दुकानांनी आठ दिवस परिसर अगदी गजबजून जात असतो आणि गावातील प्रत्येक घर पाहुण्यांनी भरलेले असते, घराघरात जणू दिवाळीचा सणच साजरा होत असतो अशा उत्साहात यात्रा भरत असते. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना या आजाराने जगभर थैमान घातले असल्याने सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे यात्रा देखील मागील दोन वर्षात फक्त विधीवत पूजा करत करण्यात आली होती परंतु, आता बऱ्यापैकी कोरोना हा संसर्गजन्य आजार नाहीसा झाल्याने शासनाने गुढीपाडव्यापासून सर्व प्रकारचे निर्बंध उठविल्याने यावर्षीची करंजी येथील चौरंगीनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे यावेळी चौरंगीनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. या प्रसंगी डॉ देसाई, सांडूभाई पठाण, रविंद्र आगवन, अनिल शिंदे आदींनी चौरंगीनाथ यात्रेविषयी माहिती दिली तसेच देविदास भिंगारे यांनी होणाऱ्या यात्रेची रूपरेषा सांगितली.