ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महा. राज्य वतीने छत्रपतींना ३९२ जयंतीदिनी अभिवादन
ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महा. राज्य वतीने छत्रपतींना ३९२ जयंतीदिनी अभिवादन
कोपरगाव प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.
त्याकाळात लोकमान्य टिळक जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले. याद्वारे त्यांनी लोकांना स्वातंत्र्य चळवळीत एकत्र आणण्यामध्ये मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी केली जाते