ब्राम्हणगाव गटामध्ये तंट्या मामा हुतात्मा दिनाच्या निमित्ताने बैठक संपन्न..
ब्राम्हणगाव गटामध्ये तंट्या मामा हुतात्मा दिनाच्या निमित्ताने बैठक संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी : मा.नामदार शिवाजीराव ढवळे साहेब राज्य मंत्री म्हाडा अध्यक्ष साहेबांच्या आदेशाने ब्राम्हणगाव गटामध्ये तंट्या मामा हुतात्मा दिनाच्या निमित्ताने बैठक आयोजित केली होती . या बैठकीत युवा जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर नगर कोपरगाव श्री. भाऊराव पवार यांनी सांगितले कि , राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा.कारण राजकारण हे जास्त काळ राहत नाही,तस समाज कार्य हे जास्तीत जास्त काळ टिकत असते .यावेळी त्यानी अनेक समाज सेवकांची उदाहरने दिली. भिल्ल समाज हा एकजुड़ झाला पाहिजे असे त्यानी सांगितले. आपल्या समाजातील मुलांना जास्तीत जास्त शिक्षण कसे देता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य संघटक अशोक माळी साहेब यांनी आपल्या समाजातील लोकांनी व्यासांना पासुन दूर राहिले पाहिजे. आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण देऊन त्याना उच्च शिक्षित करा असे त्यानी सागितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य संघटक अशोक माळी साहेब, युवा जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर नगर कोपरगांव मा.श्री भाऊराव पवार, युवा तालुका अध्यक्ष ऊत्तम भाऊ पवार, पंचायत समिति सदस्य मा.श्री श्रावण आसणे पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष मा.श्री अनुराग भाऊ येवले पाटील, निलेश वाघ, संजय पवार,चांगदेव माळी, विनोद गायकवाड़,नाना भाऊ पवार कृष्णा ,रवी पवार, आनंद भुजाडे,किरण साळवे, प्रकाश कडवे व अनेक विभागातून पदाधिकारी उपस्थित होते त्याच बरोबर ब्राम्हणगावातील जेष्ठ प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्याने ग्रामस्थ उपस्थित होते.