आपला जिल्हामहाराष्ट्र
जनार्दन स्वामींनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली – विवेक कोल्हे
संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839
जनार्दन स्वामींनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली – विवेक कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी –
मानसिक समाधानासाठी आज प्रत्येकजण धरपडत साहे, त्यiसाठी राष्ट्रसंत स्वामी मौनगिरी जनार्दन स्वामिंची शिकवण आत्मसात करुन अध्यात्मातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवावी हीच मौनगिरी जनार्दन स्वामीसाठी सचेतना ठरेल असे प्रतिपादन कोईमतूर उस संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम कोपरगांव बेटच्या कार्याची धुरा परमशिष्य प.पू. रमेशगिरी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांच्या खांद्यावर येऊन पडली त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचा व सर्व विश्वस्यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने ३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सत्कार संत पुजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व माजीमंत्री शंकरराव कोल्हे या द्वयीचे संबंध जिव्हाळ्याचे होते. सहकारातून समृद्धी साधत शंकरराव कोल्हे यांनी अध्यात्माची ध्वजपताका सतत फडकत रहावी यासाठी आश्रमाचे अध्यक्ष स्व. मोहनराव चव्हाण यांचे माध्यमांतून अविरत कार्य केले. कोपरगांवच्या भुमिला ऐतिहासिक, धार्मिक वारसा आहे. राष्ट्रसंत जनार्दनस्वामींच्या मातोश्री म्हाळसादेवी वयाच्या १७ व्यां वर्षी महानिर्वाण झाल्यानंतर १९४८ ते १९६४ याकाळात अंदरसूलच्या नागेश्वर मंदिरात तपसाधना करत अध्यात्माचा मार्ग निवडला. टापरगाव पाटील घराण्यांत जन्मलेल्या जर्नादनांनी श्रीमंतीचा त्याग करत, साध्वी जीवन पसंत करत पीनाकेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करत केला व श्रमदान हेच पुण्य दान असल्याचे जगाला दाखवून दिले, शिवभक्तीत त्यांचे कार्य अलौकिक आहे, अनेक जुन्याा मंदिरांचा जीर्णोद्धार करत त्यांनी अध्यात्माला ऊर्जा दिली, वेरूळ, पालखेड, पुणतांबा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, कोपरगांव व निफाड येथे शिवमंदिरे निर्माण केली, त्यांच्याच शिकवणुकीतून प.पू. रमेशगिरी महाराज आता हे कार्य नेटाने पुढे नेत आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी अतिशय सोप्या भाषेत परमार्थ शिकवला व जपानुष्ठान सोहळा सुरुवात करत त्याची उंची विशिष्ट स्थानापर्यंत नेऊन ठेवली आहे, युवापिढीने जनार्दन स्वामींचे कार्य अभ्यासावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील मंदिरांच्या साफसफाईच्स्वच्छतेचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा असेही ते म्हणाले.
याप्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त त्र्यंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, सुभाष शिंदे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे कामगार नेते मनोहर शिंदे, सतीश आव्हाड, आदी उपस्थित होते, शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.