यशाची चव चाखतांना अपयशही पचवायला शिकले पाहिजे :- आ. आशुतोष काळे
यशाची चव चाखतांना अपयशही पचवायला शिकले पाहिजे :- आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :- अपयशाने निराश न होता अपयशातून शिकले पाहिजे व झालेल्या चुका सुधारून पुन्हा नव्या जोमाने यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हार-जीत हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धात्मक खेळात यशाची चव चाखतांना अपयशही पचवायला शिकले पाहिजे असा मौलिक सल्ला श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिला. कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे जय बजरंग स्पोर्ट क्लबच्या यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वतीने भव्य डे नाईट ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंदचे माजी संचालक राजेंद्र जाधव, विजयराव जाधव, भास्करराव बगाटे, वसंतराव देशमुख, बाळासाहेब कासार, प्रशांत मोरे, अशोकराव जाधव, रोहिदास शिंदे, भाऊसाहेब शिंदे, विजयकुमार जाधव,अण्णासाहेब बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, खेळात यश-अपयश येणारच. यशाचे वाटेकरी अनेक असतात मात्र अपयशाची जबाबदारी कोणीच घेत नाही. त्यामुळे अपयश आल्यावर आपल्या सभोवताली असलेली गर्दी देखील कमी होते. अशावेळी न डगमगता यश मिळविण्याचा खेळाडूंनी पुन्हा प्रयत्न केल्यास हमखास यश मिळत.आयुष्यात अनेक आव्हाने असतात ती आवाहने स्वीकारून मार्ग काढायचा असतो. प्रत्येकवेळी आपल्या मनासारखेच होईल याची खात्री नाही. त्यामुळे काही वेळा हार देखील पत्करावी लागते. ती हार आनंदाने स्वीकारून पुढे जायचे असते. त्यामुळे अपयश आले तरी यश मिळविण्यासाठी अपयश पचवायला शिका असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी भाऊसाहेब जाधव, ठकणराव शिंदे, शिवाजीराव गायकवाड, विलास कासार, सुनील बेंद्रे, प्रल्हाद थोरात, सिताराम जाधव, दिलीप गायकवाड, किशोर जाधव, अण्णासाहेब शिंदे, राजेंद्र वाबळे, साहेबराव जाधव, जगदीश जाधव, भीमराज गायकवाड, सरपंच रमेशराव आहेर, उपसरपंच मोहन कासार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक महेश काळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ खेळाडू व व्हॉलीबॉल शौकीन प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.