भोसले कुंटूंबाने झाडे लावुन केली रक्षाबंधन साजरी
भोसले कुंटूंबाने झाडे लावुन केली रक्षाबंधन साजरी
पारोळा प्रतिनिधी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे.
वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या अवतीभोवती असणारी हि झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच च देता इतर अनेक गोष्टीही देतात.. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते
वृक्ष एक प्रकारे आपला भाऊच आहेत या संकल्पनेतुन रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा होत असताना श्री. अनंतराव भोसले यांची कन्या खुशी भोसले व मिहीर भोसले यानी पिंपरखेड येथील मारुती मंदिर परिसरात बगीच्यामध्ये झाडाचे रोप लावून त्याच संवर्धन व पर्यावरण रक्षण करण्याचा संकल्प केला. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी दोघांनी त्या रोपाला राखी बांधली .
अशा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन दिवस साजरा केला.