आपला जिल्हामहाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिव रेखा जगताप यांनी समतानगर भागात टाकून मिळावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिव रेखा जगताप यांनी समतानगर भागात टाकून मिळावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
कोपरगाव प्रतिनिधी : समतानगर भागातील काही ठिकाणी पक्के रस्ते नसल्यामुळे या भागात पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या सर्व ठिकाणी मुरूम टाकून मिळावा यासाठी आज ना आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव सौ. रेखाताई जगताप, आश्विनीताई गायकवाड, रत्नाताई पाठक, भाग्यश्रीताई मोरे, संगिताताई कापडे, यास्मिनताई पठाण, गंगुबाई जाधव, भावनाताई भाटकळ, सरिताताई कापडे, सरलाताई खालकर आदी महिला उपस्थित होत्या.