कोपरगाव पुरवठा विभागाकडुन गरिबांची थट्टा ! रेशनच्या गव्हात खडे?
कोपरगाव पुरवठा विभागाकडुन गरिबांची थट्टा ! रेशनच्या गव्हात खडे?
कोपरगाव प्रतिनिधी :स्वस्त धान्य दुकानांवर बरेच कुटुंब अवलंबून असून या माध्यमातून मिळणारा गहू आणि तांदूळ वर बरेच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.कारण बाजारातून गहू खरदे न परवडणाऱ्या व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय हा खूप फायद्याचा आहे.कुटुंब लाभार्थी रेशनवर दोन रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करुन दिला आहे गहू कमीत खडे आढळून आले असल्याने लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने ८० कोटी नागरिकांना पुढील तीन महिन्यासाठी २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलो, तर ३७ रुपये किमतीचा तांदूळ ३ रुपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अल्प उत्पन्न गटातील लाभाथ्र्यांना काहीसा दिलासा मिळाला. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९हजार रुपये व अंत्योदय अंतर्गत वार्षिक उत्पन्न १५ हजार आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. दि. १ एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेअंतर्गत साडेपाच लाख लाभार्थी आहेत. माणसी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू या लाभार्थ्यांना मिळत असल्याने जिल्हयात या योजनेच्या लाभार्थ्यांच्या दुकानांसमोर तांदूळ व गहू घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. २७ रुपये किलो दराचा गहू व ३७ रुपये किलो दराचा तांदूळ काय दर्जाचा असतो, हे ग्राहकांना चांगले माहीत आहे. त्यामुळे रेशनवर असाच गहू व तांदूळ मिळेल, अशी अपेक्षा ग्राहकांची होती. प्रत्यक्षात वेगळेच घडत आहे. गहू कमी आणि खडे जास्त, अशी परिस्थिती आहे. खडे बाजूला काढल्यानंतर शिल्लक राहणारा गहू पाहून शासनाने असला गहू देऊन आमची थट्टा चालवली आहे का, असाच सवाल महिला करीत आहेत. धान्यापेक्षा खड्याचेच वजन जास्त होत आहे. कोपरगाव तालुक्यात काही दुकानांत असे धान्य दिले जात आहे. असलेच धान्य दिले आहे की चांगल्या दर्जाचे दिले जाते? कोणत्या गोदामातून हे धान्य आणले आहे, हे रेशन दुकानदार सांगत नाहीत. पाहिजे असेल तर घ्या नाही, तर थांबू नका, असा दुकानदारांकडूनच दम भरला जात आहे.त्यामुळे या गहू, तांदळाचा दर्जा तपासण्यात यावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.