वनसंवर्धन दिनादिवशी ब्रम्हणगावतील वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई करा – श्रावण आसने
वनसंवर्धन दिनादिवशी ब्रम्हणगावतील वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई करा – श्रावण आसने
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावातील अवैध वृक्षतोडीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. हे चिंचेचे हिरेव झाड अवैद्य पध्दतीने तोडून व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे.सदर झाड अवैद्य पध्दतीने तोडले असल्याने यावर श्रावण आसने यांनी कोपरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र देऊन पंचनामा करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी आपल्या पत्रात केली आहे.
“वनसंवर्धन दिन हा दिवस निसर्गातील प्रत्येक गोष्टी जसे झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात नैसगिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो.आताच्या चालु युगाला विज्ञान आणि तंत्रज्ञाना चे प्रगतशील युग म्हटले जाते. आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व तंत्रांच्या आधारावर विकास आणि प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी जगात चढाओढ करत आहे. हे करत असताना मानवाच्या वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने ,उत्पादने यांची वाढती गरज आणि सोबतच लोकसंख्यानुसार वाढती मागणी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ताण नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत आहे.नैसर्गिक वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपली वस्ती बसवत आहे , ही वस्ती बसवताना लोक ही गोष्ट विसरतं की विकास गरजेचा अत्यावश्यक आहे तशीच ही वृक्षसंपदा टिकणे त्यापेक्षाही महत्त्वाची आहे.
याच दिवशी जर वृक्षतोड होत असेल तर शोकांतिका आहे.तरी ब्राम्हणगावातील ह्या झाडाचा लवकरात लवकर पंचनामा करून दोषीवर कारवाई करावी म्हणजे यापुढे अशी प्रकारच्या घडना घडणार नाही असे यावेळी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले