शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी :- जेऊर कुंभारी येथील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी येथील अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत दि.४ सप्टेंबर रोजी कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांना शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही.शासनाने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना पंचनामे झाले मात्र यात तोंड पाहुन पंचनामे झाल्याचे निर्दशनास आले आहे त्यामुळे बरेच शेतकरी अनुदानापासुन वंचित राहीले आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात यांना विचारणा केली असता पंचनामे करून सर्व याद्या ग्रामपंचायतकडे पाठवण्यात आल्या व हि सर्व माहिती तहसीलदार कार्यालयाकडे पाठवली असल्याचे असल्याचे सांगण्यात आले परंतु याबाबत संशोधन केले असता बऱ्याच शेतकऱ्यांचे अगोदर पंचनामे करूनही त्यांची नावे दुसऱ्या यादीत आलेली आहेत.त्यामुळे दुसऱ्या यादीतील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.याबाबत ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.मायबाप शासनशेतकरी जगावा
यासाठी जिवाचा आटापिटा करत असताना कर्मचारीवर्ग मात्र वैयक्तिक स्वार्थापोटी वशिलेबाजी करत आहेत,याद्यामध्ये फेरबदल करत आहेत शेतकऱ्यांच्या हितापेक्षा चिरीमिरीसाठी आपली सद- सद विवेक बुध्दी गहाण ठेवत आहेत यासंदर्भात आपण सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या झारीतील शुक्राचार्याच्या संबंधितांच्या कामासंदर्भात चौकशी करून तातडीने कारवाई करावी तसेच जेऊर कुंभारी येथील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते ,माजी सरपंच राजेंद्र गिरमे,कल्याणराव गुरसळ, महेंद्र वक्ते,तुषार गुरसळ, सुनिल वक्ते ,राजेंद्र वक्ते,नारायण गुरसळ, शिवाजी वक्ते,आप्पासाहेब वक्ते,मधुकर गुरसळ, तुळशीदास गुरसळ, संजय शांतीलाल वक्ते, मार्तंड जाधव ,भास्कर गायकवाड, किशोर वक्ते,नानासाहेब गुरसळ,हनुमंतराव मेहेत्रे ,अमोल दौंड, अजिंक्य वक्ते, ,पोपट शिंदे, दौलत वक्ते ,नितीन वक्ते, शिवाजी गुरसळ,किरण आव्हाड, अमित भोंगळे, चांगदेव घुडघे, किरण आव्हाड, शंकर वक्ते, नारायण गुरसळ, बंडू मोकळ, किरण गुरसळ,बाळासाहेब गुरसळ, किरण वक्ते,गिरधर गुरसळ, आदी सह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.