विजय सुधाकर जाधव

शेतीमालाचे झालेले नुकसान  भरपाई त्वरित द्या अन्यथा पुन्हा उपोषण:- विजय सुधाकर जाधव

शेतीमालाचे झालेले नुकसान  भरपाई त्वरित द्या अन्यथा पुन्हा उपोषण:- विजय सुधाकर जाधव

कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांना साल २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मदत ही तातडीने मिळावी ह्या करिता कोपरगाव तहसिल कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते त्या अनुषंगाने उपोषण सुरु केले होते.आपण महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी या नात्याने उपोषणकत्यांची उपोषणस्थळी येऊन चर्चा केली होती व शासनाच्या वतीने लाभार्थी शेतकन्यांची यादी लवकरात लवकर शासनाला देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. व लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात अपेक्षित रक्कम जमा करण्यासाठी पाठपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते आमच्या प्रतिनिधींसोबत आपली सखल चर्चा होऊन व आपल्या विनंतीस मान देऊन आम्ही उपोषनाच्या दिवशी सायंकाळी आपल्या उपस्थितीत आमचे सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. त्यास आज जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे परंतु अद्यापही नुकसानग्रस्त शेतकन्यांच्या खात्यात कुठलीही रक्कम जमा झालेली नाही.आधीच ह्या वर्षी कोरडा दुष्काळाची परीस्थीती आहे व शेतकऱ्याचे उभे पिक हाती पडण्याची शक्यता नसल्यात जमा आहे तसेच मा. जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या अहवालात यावर्षी खरीपात जवळपास उत्पन्नात ८०% पेक्षा जास्त घट असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला आहे. अश्यावेळी त्यास आर्थिक आधाराची अत्यंत आवश्यकता आहे.त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आपण महाराष्ट्र शासनास विनंती करुन लवकरात लवकर म्हणजे येत्या आठवडाभरात नुकसानग्रस्त शेतकन्याच्या खात्यात कुठलीही अटीविना व E-KYC करायला न लावता महाराष्ट्र सरकारने यावर्षी दिलेल्या कांदा अनुदानाप्रमाणे थेट लाभार्थ्याने दिलेल्या खात्यात वर्ग करावे. याआधी EKYC करणे बंधनकारक राहिल अशी कुठलीही अट यापूर्वी नव्हती परंतु राज्य सरकारने नव्याने हा निर्णय जाहीर करून वेळ काढू पणाचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. असे करणे म्हणजे आधीच नुकसानीने ग्रस्त असणार्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विनाकारण आर्थिक व मानसिक छळ करण्यासारखे आहे. वरील अट ही रद्द करण्यात यावी व अनुदानाची रक्कम ही थेट खात्यात वर्ग करावी ही नम्र विनंती.अन्यथा दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी स्थगित केलेले आमरण उपोषण आता कुठल्याही मुदतीशिवाय म्हणजे बेमुदत आमरण उपोषण तहसिल कार्यालय कोपरगाव यांच्या कार्यालयाबाहेर दिनांक २५ सप्टेंबर २०२३ वार सोमवार पासून पुन्हा सुरु करण्यात येईल.असा इशारा ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांनी दिला आहे.सदरचे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना दि.१८/९/२०२३ रोजी दिले असुन माहितीसाठी, प्रांताधिकारी, अहमदनगर,  मा. पोलिस अधिक्षक सो.. शिर्डी, अ.नगर, पोलिस निरीक्षक सो., कोपरगाव, नानासाहेब पटोले सो प्रदेशअध्यक्ष, किसान काँग्रेस, बाळासाहेब थोरात सो., मा. महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य,मा. पराग कष्टे सो., महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, किसान काँग्रेस यांंना प्रत रवाना केली आहे

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे