कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सरकारी कर्मचारी यांना निलंबित करा
कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सरकारी कर्मचारी यांना निलंबित करा
कोपरगाव प्रतिनिधी -: PM किसान सन्मान निधी, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी किंवा पिक विमा असेल शेतकरी वर्गाची सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात २०२२ झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले होते .२०२२ साली झालेल्या अतिवृष्टी मध्ये मोठमोठ्या शेतकऱ्यांची १००% नुकसान दाखवले व गरीब शेतकऱ्याचे ३०% व ३५% टक्के असे अधिकाऱ्यांनी दाखवली. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे देणे व KYC करणे ही वेळ आली आहे.त्यात कृषी अधिकारी यांचे कार्यालय नेहमी बंद असतात .कृषी अधिकारी कामात कसूर करतात अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी असे पत्र कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले
यावेळी मोतीराम निकम,प्रकाश शिंदे ,नवनाथ वाघ,मच्छिंद्र वाळुंज,किसन सोनवणे,अजिनाथ रक्ताटे,काशिनाथ पांडेकर,संजय रक्तांटे,बाळासाहेब फटांगरे,गोरख फटांगरे आदी शेतकरी उपस्थित होते