ब्राह्मणगांवातील गायरान अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी -अनुराग येवले
ब्राह्मणगांवातील गायरान अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी -अनुराग येवले
कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राह्मणगांव व संपुर्ण कोपरगाव तसेच महाराष्ट्रभर गायरान अतिक्रमण काढण्याचे मा.सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.त्या प्रमाणे तहसीलदार यांनी ब्राह्मणगांव येथील १०८ नागरिकना नोटिस बजावली आहे.तरी ही करवाई तत्काळ थांबवी अशी विनंती ब्राह्मणगांव येथील युवा नेते अनुराग येवले यांनी केली आहे.हे अतिक्रमण नसून येथे ही लोक गेल्या तीन पिढ़यापासून राहत असून त्यांनी घरकुल योजने अंतर्गत घरकुले बांधली ते वर्षानु वर्ष ग्रामपंचायतला घरपट्टी व पाणी पट्टी भरत आहे.ह्या ठिकाणी शासनाने रस्ते, गटारी, पाणी योजना,सभामंडप आदि योजना देऊन वस्ती चा विकास केला आहे. ह्या गोर गरीब लोकाना राहण्यासाठी इतर कुठेही दूसरी जागा नाही. यानी उद्या कुठे जायचे कसे राहायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे त्या मुळे शासनाने काहीतरी करुन ही कारवाई थांबवी अशीच विनंती अनुराग येवले यांनी शासन दरबारी केली आहे.
अनुराग येवले तसेच ब्राह्मणगांव येथील संजीवनी कारखाना चे संचालक नेवृत्ती भाऊ बनकर,बाळासाहेब बनकर, शांताराम जगधने,भास्कर शिगाड़े,आदिनी मा.विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या सोबत मा तहसीलदार विजय बोरुड़े साहेब यांची भेट घेऊन त्यांना देखील ही समस्या सांगितलीं आहे..विवेक भैय्या कोल्हे यांच्या सूचने नुसार पुढील करवाई थांबविण्यासाठी मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालय मार्फत सर्व पुरावे सादर करण्याचे सांगितले आहे..मा विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखली सर्व नोटिस आलेल्या ग्रामस्थांना घेऊन पुराव्या निशि म्हणने तहसील कार्यालय येथे मांडणार आहे व ह्या आमच्या गोर गरीब जनते बरोबर शेवट पर्यत राहणार असल्याचे अनुराग येवले यांनी सांगितले .