नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह इतरांना कोपरगावच्या तहसीलदाराचे आवाहन
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह इतरांना कोपरगावच्या तहसीलदाराचे आवाहन
कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसह इतर सर्वाना कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी आवाहन केले आहे की आपण सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास शासनाकडे अनुदान मागणी लवकर करता येईल.
या विषयी तहसीलदार बोरुडे यांनी अधिक माहिती दिली की, सप्टेंबर महिन्यात दोन वेळा अतिवृष्टी आणि सर्वदूर संततधार पावसामुळे बहुतेक सर्व पिकांची नुकसान झाले आहे तर काही भागात आत्ताही अनेक पिकेपाण्याखाली आहेत.
तालुक्यातील सर्वच गावातील तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक हे संयुक्त पंचनामे करत आहेत.तरीही आपण आपल्या शेतातील नुकसान झालेले फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून ठेवा. तसेच आपल्या इथे शासकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी आल्यावर त्यांना आवश्यक ती आपली माहिती तसेच आपले बँक खात्याची माहिती बँकेचा IFSC नंबर त्यांना तत्काळ देत सहकार्य करावे.
तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्या करिता व बँक अकाउंट डिटेल्स गोळा करण्या करिता आपल्या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्यास लवकरात लवकर आपण शासनाला नुकसानीची अंतिम आकडेवारी देऊ शकू त्यामुळे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
तसेच गावातील दक्षता समिती तंटामुक्ती समिती चे सर्व सदस्य यांनी या कामी गावातील तलाठी ग्रामसेवक यांचेकडे नुकसान ग्रस्त शेतकरी यांची यादी बँक अकाउंट डिटेल्स सह दिल्यास पंचनामे लवकर होतील.
आज सर्वच शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे. आपण सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास शासनाकडे अनुदान मागणी लवकर करता येईल.तसेच ज्यां शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसेल अशा व्यक्ती चा या यादी मध्ये समावेश चुकून ही करू नका.असे आवाहन तहसीलदार बोरुडे यांनी केले आहे.
तहसीलदार बोरुडे यांनी जय किसान.या घोषणेप्रमाणे चला शेतकऱ्यासाठी पुढील एक आठवडा देऊ यानुसार
आपल्या गावातील शेतकऱ्यांचा डाटा बेस देखील प्रशासन या निमित्ताने तयार करणार आहे. त्यामुळे पुढील काळात अशी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास तत्काळ मदत पुरवता येईल .
तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांनी कार्यकर्ते यांचे कडून याद्या घ्याव्यात. गावचा डाटा बेस तयार करावा.आणि ज्यांचे नुकसान झाले आहे अशा व्यक्तींची यादी संयुक्त पंचनामा सह जमेल तितक्या लवकर सादर करावी. असे आवाहन तहसीलदार बोरुडे यांनी केले आहे.