“महावितरण’ मुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
“महावितरण’ मुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
कोपरगाव प्रतिनिधी : महावितरणच्या कारभारामुळे ब्राम्हणगावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. शिवारात बऱ्याच ठिकाणी वाकलेले पोल यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्याचा जीव घेतल्यावर महावितरणचे डोळे उघडणार ? असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहे. ब्राम्हणगावातुन रवंदेकडे जाणारा मुख्य रस्त्याच्या कडे लगत विजेचे पोल वाकलेले दिसत आहे.
गेल्या काही दिवसा पुर्वी या विजेच्या पोलचे काम झाले असुन हे पोल आताच वाकले असुन या कामात अतिशय हलगर्जीपणा केलेले असुन या कामाची चौकशी करावी अशी चर्चा सुरू आहे. यासह शेतामध्ये देखील असे वाकलेले पोल पहावयास मिळत आहेत. शिवाय पावसाळा सुरू असताना या परिसरात शेतीचे कामे सुरू असल्याने शेतात लोकांची वर्दळ सुरू आहे. असे धोकादायक विजेचे पोल कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते .याबाबत वीजवितरण कंपनीने दखल घेऊन असे धोकादायक विजेचे पोल सुस्थितीत उभे करण्याची मागणी ब्राम्हणगाव परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.