कंगना राणावत वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा -कोपरगाव काँग्रेस अर्जाची मागणी
कंगना राणावत वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा -कोपरगाव काँग्रेस अर्जाची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी -मागील आठवड्यात कंगना राणावतने भारत देश खऱ्या अर्थाने २०१४ला स्वतंत्र झाला असून १९४७ आली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते असे बेताल वक्तव्य केले होते राणावतच्या या बेजबाबदार वक्तव्याने ज्या ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांचा अवमान झाला असून देशभरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेले आहे .त्यामुळे अशा राष्ट्रविरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कोपरगाव शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अजा विभागाच्या जिल्हाध्यक्ष सविता विधाते ,काँग्रेसचे युवा नेते आकाश नागरे ,कोपरगाव शहर काँग्रेस कमिटी अजां विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र साबळे ,कार्याध्यक्ष युसुफभाई शेख,उपाध्यक्ष अबूबकर मन्यार ,शहर काँग्रेसचे छोटू भाई पठाण, बाबुराव पवार, तालुका काँग्रेसचे विष्णू पाडेकर ,सिद्दिक शहा ,प्रकाश दुशिंग अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.