झाडांसोबत मैत्री असणारा माणूस
झाडांसोबत मैत्री असणारा माणूस
कोपरगाव प्रतिनिधी : समाजावर सातत्याने संकट येतं असताना माणूस माणसा पासून दुर होतं चालला आहे. नाती गोती सुध्दा साथ देतील कि नाही असा कोरोनाचा काळ येऊन गेला आहे. पण तरीही समाजात अजुनही अशी काही माणसं आहेत ज्यांच्या कर्तृत्ववाने आपण माणूस म्हणून किती ग्रेट आहे असा आपल्याला अभिमान वाटेल.
हि गोष्ट आहे अशाच एका अवलियाची ज्यांनी आपल्या वृध्दापकाळात एकटेपणाला न जुमानता, नोकरीतून निवृत्त झाल्यावर समाजाला आदर्श घालून दिला आहे. ती व्यक्ती म्हणजे आदर्श गाव सांगवी भुसार येथील पुंजाराम श्रीपत माळी ही होय. त्याला कारणही तसेच आहे. या व्यक्तीचा आदर्श घ्यावा असाच आहे. त्यांनी नोकरी तून निवृत्त झाल्यानंतर स्वस्त न बसता गावात वृक्षारोपण चळवळीला वाहून घेतले आहे. नव्हे नव्हे तर अगदी वृक्ष हेच माझे मित्र असे म्हणतं गावाला हिरवाईने नटवले आहे.
गावात विविध संस्था आणि शासकीय अधिकारी यांच्या योजनांचा वापर गावात होणार होता पण ही योजना यशस्वी होण्यासाठी एका प्रामाणिक, भावनिक, कर्तृत्ववान माणसांची साथ हवी होती. आणि असा एकमेव माणूस होता आप्पा! संपूर्ण गावातील लहान मोठे त्यांना आप्पा याचं नावाने ओळखतात. जसे ते सर्वांचे आप्पा झाले तसेच ते गावातील वृक्षांचे सुध्दा आप्पा झाले असे म्हणता येईल कारण त्यांनी अगदी आपल्या मुला- नातवा प्रमाणे वृक्षांची काळजी घेतली.
सांगवी भुसार हे आदर्श गाव आहे. आणि येथील माणसं सुध्दा आदर्श आहेत याचं उत्तम उदाहरण ठरले ते आप्पा अर्थात पुंजाराम श्रीपत माळी. कोळपेवाडी साखर कारखान्यातून रिटायरमेंट झाल्यावर त्यांनी वृक्षां भोवती स्वतः ला समर्पित होऊन रात्रंदिवस काम केले म्हणूनच आज सांगवी भुसार मध्ये जवळपास १००० हुन अधिक विविध देशी जातीचे झाडे व नारळाची आकर्षक झाडं गावाची शोभा वाढवत आहेत. त्यांची मुलं, नातवंड, कुटुंब सर्वांनी त्यांनी या कामांत सहभाग घेण्यासाठी आडकाठी केलेली नाही.
पुंजाराम श्रीपत माळी यांच्या याचं कार्याची दखल घेऊन ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने त्यांना मानाचा वृक्ष मित्र २०२१ हा पुरस्कार जाहीर करून सन्मान केला आहे. पुरस्कारांची घोषणा संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष श्री.सोमनाथ डफाळ यांनी केली. ही निवड अगदी योग्य आहे ,समाजाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे कवी, लेखक पंडित निंबाळकर यांनी सांगितले. सांगवी भुसार गावचे नेतृत्व महानंदा दुध संघ, मुंबई माजी उपाध्यक्ष श्री राजेंद्र जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच कृषिभुषण विजय जाधव, सरपंच रमेश आहेर, उपसरपंच मोहन कासार, ग्रामसेवक काळे भाऊसाहेब यांनी देखील त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
वृत्तांकन लेखक- पंडित निंबाळकर