आपला जिल्हाराजकीय

अशोकराव काळे दोनदा शिवसेनेचे आमदार झाले तेव्हा गंगुले कुठे होते ? आशिष निकुंभ

अशोकराव काळे दोनदा शिवसेनेचे आमदार झाले तेव्हा गंगुले कुठे होते ? आशिष निकुंभ

कोपरगाव : २००४ व २००९ साली अशोकराव काळे दोनदा शिवसेनेचे आमदार झाले. २०१४ साली आशुतोष काळे यांनी शिवसेनेची उमेदवारी केली तेंव्हा शिवसेनेचे काही लोक सोडून गेले. परंतु संजय सातभाई व योगेश बागुल यांनी अनेकांचा रोष ओढवून शिवसैनिक म्हणून काळे बरोबरच होते. याची कदाचित गंगुले यांना माहिती नसावी असा टोला लगावून शिवसेना नगरसेवक अपात्रतेवरुन सातभाई यांनी आघाडी धर्माबाबत केलेले सत्य जिव्हारी लागल्याने मिरच्या झोंबलेले थयथयाट करणारे सुनील गंगुले तेंव्हा कुठे होते ? तसेच सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मा.शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आली होती त्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ईडीच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाने निषेध / धरणे आंदोलने केली होती. तेव्हा तुम्ही स्वत: शहराध्यक्ष असताना भाजपा पक्षाच्या उमेदवाराचे तिकीट मिळेल या आशेवर तुम्ही व तुमचे नेते धावपळ करत होते. या आंदोलनापासुन तुम्ही व तुमच्या नेत्यांनी दुर रहाणे पसंत केले त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे दोन तीन निष्ठावंत कार्यकर्ते यांनीच या आंदोलनात भाग घेतलेला होता हे संपुर्ण कोपरगावकरांनी पाहिलेले आहे. तेव्हा निष्ठेच्या गोष्टी आपण कुणाला शिकवु नये असा सवाल युवासेनेचे उपशहराध्यक्ष आशिष निकुंभ यांनी केला.

सन 2014 च्या पराभवानंतर आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेंव्हा शिवसैनिक संजय सातभाई यांनी शिवसेनेत राहणेच पसंत केले व शिवसेनेशी असलेली निष्ठा जपली. संजय सातभाई हे कोपरगाव नगरपालिकेत शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष होते. सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई या देखील शिवसेनेच्या नगराध्यक्षा होत्या. इतिहास तपासून बघा सातभाई गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेतच आहे. गेली 55 वर्ष कोपरगाव नगरपालिकेमध्ये सातत्याने नगरसेवक म्हणून निवडुन येणाऱ्या सातभाई कुटुंबाबद्दल शहरातील जनतेला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पाणी, रस्ते व वीज यासाठी केलेले काम कोणालाही विसरता येणार नाही. सातभाईंच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्ही बोललात तर सातभाईंची आर्थिक परिस्थिती व व्यवसाय हे संपुर्ण कोपरगांव शहराला माहिती आहे. तुमची पुर्वीची व आत्ताची ही आर्थिक परिस्थिती कोपरगांव शहर जाणुन आहे तुमचे धंदे आणि व्यवसायाची शहराला नव्याने ओळख करुन द्यायची गरज नाही नेत्याचे लांगुलचालन करणाऱ्या लुंग्या सुंग्याची सातभाई यांच्यावर बोलण्याची लायकीच नाही असा टोला निकुंभ यांनी लगावला.
सन २०१६ साली कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली. संजय सातभाई यांनी भाजपा बरोबर शिवसेना म्हणून युती केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाणावर सहा नगरसेवक निवडूनही आले त्यांचा शिवसेना म्हणून स्वतंत्र गट होता. सन २०१९ ला शिवसेना भाजप युती झाली आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी केली. तेव्हा शिवसैनिक संजय सातभाई यांनी शिवसेना भाजप युतीचे काम केले. सेना-भाजप युतीत बिघाडी होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. परंतु कोपरगाव नगरपालिकेत शिवसेना-भाजप युती असल्यामुळे ती तशीच राहिली. शिवसेनेचा स्वतंत्र गट आहे व शिवसेनेचे नगरसेवक हे धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत. कैलास जाधव व योगेश बागुल हे शिवसेनेचे निष्ठावान पदाधिकारी आहेत ते अपात्र झाले आहेत. हे सतरा पक्षात फिरून आलेल्या काळे व राष्ट्रवादीमुळे आता कुठे पक्षाची ओळख मिळालेल्या सुनील गंगुले यांना माहीत नाही का ? सातभाई शिवसेनेत राहिले म्हणूनच गंगुलेना किमान काळे सैनिक म्हणून संधी मिळाली हे सातभाईंचे उपकार विसरू नका. वड्याचे तेल वांग्यावर काढून कांगावा करू नका, सातभाई यांच्या नावाने कितीही आगपाखड केली तरी शिवसेनेच्या नगरसेवकांना अपात्र करण्याचे पाप केले ते झाकले जाणार नाही.

शिवसेनेचे दोन नगरसेवक अपात्र करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांच्या आडून जनहिताच्या नावाखाली राष्ट्रवादीने छुपी मदत केली याचे शिवसेनेत तीव्र पडसाद उमटले. त्यावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना टार्गेट करणा-या सुनील गंगुले यांच्यावर टीकेची झोड उठवलेली होती. आजपर्यंत कोट्यावधी निधी आणल्याच्या भाषा केल्या गेल्यात पत्रके निघाली फ्लेक्स लागलेले कार्यक्रम झाले. जेवढे उद्घाटनाची मोठमोठाली कामे झाली तिथे कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला बोलविण्यात आले नाही निमंत्रण पत्रिकेत साधे शिवसेना खासदाराचे नाव टाकले जात नाही किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्यांचे फोटो लावले जात नाहीत की त्यांची नावे टाकली जात नाहीत केवळ एकीकडे आघाडी धर्म म्हणायचे आणि केवळ राष्ट्रवादीचे घोडे पुढे दामटत राहायचे अशी अनेक उदाहरणे देता येतील.आघाडी धर्मामध्ये मनसेचा प्रश्न येतोच कुठे आणि अधिकाऱ्याला शिवीगाळ मारहाण झाली असेल तरी याचे राष्ट्रवादीला लागण्याचे कारण काय ?

कायदा हातात घेणार असेल तर त्या त्याठिकाणी कुणीही असले तरी त्याला कायद्याने शिक्षा होणारच कारण कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही अशी भाषा करणाऱ्या गंगुले आणि त्यांच्या पक्षाने ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरविले त्या मनसेच्या कार्यकर्त्यांने सुद्धा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन मारहाण शिवीगाळ केली त्याच्यावर सुद्धा ३५३ कलम लागलेला आहे. तेंव्हा अधिका-याबद्दलचे पुतना मावशीचे प्रेम गंगुले व राष्ट्रवादीचे कुठे गेले होते ? अन्याय झालेल्या अधिकाऱ्यांना न्याय मागू द्या तुम्ही कशाला लुडबुड करता,

हे केवळ शिवसेनेच्या नगरसेवकांना अपात्र करून राष्ट्रवादीच्या मार्ग मोकळा करण्याचे षड्यंत्र आता लपून राहिलेले नाही. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना कोल्हे गटाचे नगरसेवक म्हणून स्वतःचे पाप झाकता येणार नाही हे लक्षात ठेवा.
यावेळी आघाडी धर्मावरून बरेच टोमणे लगावून खरपूस समाचार घेतला.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे