आपला जिल्हा

ना.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार कोपरगाव नागरिकांना आता मिळणार चार दिवसाआड पाणी राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील रस्त्यावरील खड्डे देखील बुजवण्यास सुरुवात

ना.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार कोपरगाव नागरिकांना आता मिळणार चार दिवसाआड पाणी राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील रस्त्यावरील खड्डे देखील बुजवण्यास सुरुवात

कोपरगाव प्रतिनिधी :-ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून पूर्ण क्षमतेने भरून घ्या व नागरिकांना ४ दिवसाआड पाणी द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार कोपरगाव शहरातील नागरिकांना रविवार (दि.३१)पासून ४ दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


तसेच कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवावे अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिले होते त्याची दखल घेवून कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.


मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु असल्यामुळे कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले होते. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे सर्व रस्त्यावरील सर्व खड्यात पाणी साचून नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडली होती. या रस्त्यावरून वाहनांना खड्डे चुकवितांना कराव्या लागत असलेल्या कसरतीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडण्याची शक्यता निर्माण होवून नागरिकांना पायी चालणे देखीलअवघड होवून बसले होते. याचा शालेय विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होत होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हि बाब कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देवून पालिकेचे लक्ष वेधले होते. त्यावेळी मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच खड्डे बुजविले जातील अशी ग्वाही दिली होती. त्याची तातडीने कार्यवाही करतांना पालिकेने गुरुवार (दि.२८) पासून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामा हाती घेतले असून कोपरगाव शहरातील मार्केट यार्ड रोड, खडकी रोड, मार्केट यार्ड रोड व नवीन नगरपरिषद ते श्री शनी मंदिर रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना होत असलेली अडचण ओळखून वेळीच कोपरगाव नगरपरिषदेचे लक्ष वेधून केलेल्या पाठ्पुराव्याचे स्वागत करून आभार मानले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे