मुख्यमंत्री महोदयांनी समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज ला शिर्डी ऐवजी कोपरगाव असे नाव द्यावे …माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
मुख्यमंत्री महोदयांनी समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज ला शिर्डी ऐवजी कोपरगाव असे नाव द्यावे …माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
कोपरगाव प्रतिनिधी -: उद्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या कोकणठाण शिवारात असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लँडिंग व टेक ऑफ असणाऱ्या इंटरचेंज च्या दुसऱ्या टप्प्याच्या कोपरगाव ते घोटी या रस्त्याच्या लोकार्पण साठी येत आहे करणार आहे. शिर्डी असे नं म्हणता नागपूर ते कोपरगाव पहिला टप्पा दुसरा टप्पा कोपरगाव ते घोटी असे संबोदावे.
कोपरगाव करांवर नेहमी अन्याय झालेला आहे. खरे तर कोपरगाव तालुक्यात काकडी विमानतळ देखील आहे ते कोपरगावच्या सीमेच्या हद्दीत आहे .तरीदेखील त्या विमानतळाला शिर्डी विमानतळ असे नाव देण्यात आले. कोपरगाव चा साधा कुठे उल्लेख नाही. त्यालाही कोपरगाव विमानतळ असे नाव द्यावे.
पूर्वी कोपरगाव लोकसभा मतदारसंघ होता त्याचे नाव काढून बदलून शिर्डी लोकसभा मतदारसंघ असे करण्यात आले. शिर्डी ही पूर्वी कोपरगाव तालुक्यात होती ,तीही कोपरगाव पासून तोडून राहता तालुक्यात नेण्यात / जोडण्यात आली.
कोपरगाव ला रेल्वे स्टेशन असताना सुद्धा शिर्डीला नवीन रेल्वे स्टेशन करण्यात आले .त्यामुळे कोपरगाव वर व कोपरगावातील व्यवसायिकांवर मुख्यतः रिक्षावाले ,टॅक्सीवाले , हॉटेलवाले इत्यादी वर खूप मोठे आर्थिक संकट आले. कारण रेल्वे येऊन उतरल्यानंतर टॅक्सीवाले हे शनिशिंगणापूर शिर्डी असे दर्शन करून आणत व परत रेल्वे स्टेशनला सोडत. या लोकांच्या रोजी रोटी वर खूप मोठा परिणाम झाला. पूर्वी कोपरगाव बस डेपो मोठा होता ,परंतु त्यापेक्षाही मोठा शिर्डीत करण्यात आला.
कोपरगावात असणारे कोर्ट देखील राहाता त गेले, त्यामुळे कोपरगावत कामानिमित्त होणारी गर्दी कमी झाली. अनेक वकिलांना स्थलांतर करावे लागले/ करावे लागत आहे.त्यामुळे टायपिंग , झेरॉक्स जनरल स्टोअर या दुकानांवर या व्यवसायिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला. पूर्वी शिर्डीतील सर्व व्यावसाय ही कोपरगावला कपडे, स्टेशनरी हॉटेलला लागणारे सर्व गोष्टी किराणामाल भाजीपाला चपला बूट घेण्यासाठी कोपरगावला येत असेत. आता ही खरेदी सर्व जवळजवळ बंद झाली.
कोपरगाव मार्केट कमिटी ही खूप मोठी होती .त्याकाळी उपबाजार साकोरी येथे करण्यासाठी कोपरगावच्या मार्केट कमिटीने त्या ठिकाणी जागा घेतली होती. तीही जागा राहता तालुक्यात गेली. त्यामुळे साईबाबा संस्थान पूर्वी कोपरगाव मधून भाजीपाला ,फळे , फुले , धान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करत असत .आता ते बऱ्यापैकी पूर्णपणे बंद झाले असून राहता शिर्डी भागातूनच ते घेतात. त्यामुळे शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग यांचे मोठे आर्थिक नुकसान व्यवसायाच्या रूपाने कोपरगाव शहराला सहन करावा लागत आहे. शिर्डी हे जर कोपरगाव तालुक्यात राहिले असते तर साईबाबांच्या रूपाने येणारा मोठ्या प्रमाणातला रेवेन्यू जो विकासासाठी वापरता येतो तो जो शेष आहे त्यापासून विकास होतो , तो कोपरगाव शहरासह तालुक्यात झाला असता . परंतु तो सर्व शिर्डीत व शिर्डी परिसरात होत आहे. शिर्डी वेगळी झाल्यामुळे कोपरगाव ची पूर्णपणे ओळख पुसली गेली .
त्याचबरोबर प्रांत ऑफिस देखील शिर्डीला झाले . तसेच डीवायएसपी पोलीस उप विभाग हा देखील शिर्डीला झाला. मोठमोठे सरकारी निवास शिर्डीत झाले. तेथे अनेक कुटुंब राहतात. त्यामुळे खरेदीच्या रूपाने चलन देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होते , त्यामुळे व्यवसाय वाढतो तेही कोपरगावला मुकावे लागले.
एवढेच नाही आता तर साईबाबांच्या दर्शनाला फक्त शिर्डीकरांना गावकरी गेटणे सोडले जाते कोपरगावकरांना दर्शनाला जाऊ दिले जात नाही. ही मोठी दुःखाची व खेदाची बाब कोपरगावच्या नागरिकांना साई भक्तांना सोसावी लागत आहे. शिर्डीचे साईबाबा हॉस्पिटल आहे तिथे देखील नकळत कोपरगावकरांना दुजाभाव दिला जातो. राहता तालुका ही आपलाच आहे नाही असं नाही. परंतु शिर्डी कोपरगावतून गेल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कोपरगाव तालुक्याला मोठी व्यवसायिक दृष्टीने व फायनान्शिअल दृष्टीने सेट बॅक बसला. तो अजूनही बसत आहेत. तरी निदान यासाठी शिर्डी विमानतळ असे न म्हणता व शिर्डी समृद्धी महामार्ग इंटरचेंज ला कोपरगाव असे संबोधावी . कारण ते कोपरगावच्या हक्काचे व तालुक्याच्या हद्दीत आहे. जेणेकरून कोपरगाव चे नाव जगभर जाईल व निश्चितपणे हे नाव दिल्यानंतर शहर व तालुका वाढीसाठी शंभर टक्के मोठा बदल होईल असे नागरिकांचे मत आहे.
तरी सहानुभूती पर विचार करून शिर्डी असे न म्हणता कोपरगाव विमानतळ व समृद्धी महामार्ग इंटरचेंज कोपरगाव असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना देऊन कोपरगावकरांवर होणारा झालेला हा अन्याय दूर करावा