आपला जिल्हा

गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे – स्नेहलता कोल्हे.

गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे – स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव प्रतिनिधी : दारणा गंगापूर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून ओवरफ्लोचे पाणी गोदावरी नदीला सोडले जात आहे, तेव्हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, दगडी साठवण बंधारे, या पाण्याने भरून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे खात्याकडे केली आहे.  
             सौ स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, गोदावरी डाव्या आणि उजव्या कालवा लाभक्षेत्रात  चालू वर्षी पाऊस उशिराने पडत आहे अजूनही भूगर्भातील  पाण्याची पातळी वाढलेली नाही, तेव्हा ओव्हरफ्लोच्यi पाण्याने गावतळे, साठवण बंधारे, दगडी साठवण बंधारे भरून द्यावे अशी असंख्य शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागणी केली आहे.   भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.  तेव्हा नाशिक पाटबंधारे विभागाने तात्काळ गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यात लाभक्षेत्रातील गावतळी साठवण बंधारे दगडी साठवण बंधारे पाण्याने भरून द्यावे असे सौ स्नेहलता कोल्हे  शेवटी म्हणाल्या.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे