ब्राम्हणगाव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित कोपरगाव प्रतिनिधी : एक कॉल करून सर्व गावाला
ब्राम्हणगाव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
कोपरगाव प्रतिनिधी : एक कॉल करून सर्व गावाला एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सूचना देणे सावध करणे किंवा मदतीला बोलवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा उपयोगी आहे.
*ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर कोणत्या घटनेसाठी करावा –*
चोरी दरोड्याची घटना गंभीर अपघात,निधन वार्ता,आग जळतीची घटना,सर्पदंश,पिसाळलेला कुत्रा गावात येणे,बिबट्याचा हल्ला,लहान मूल हरवणे,महिलांची छेडछाड,वाहन चोरी,शेतमालाची चोरी,ग्रामसभा, घरपट्टी व पाणीपट्टी आधार कार्ड,पॅन कार्ड गोळा करणे ग्रामपंचायत कडून दिली जाणारी सरकारी योजनाची माहिती व सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती तसेच लसीकरण,पल्स पोलिओ,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, कोरोनाच्या संबंधी कॉल…
*कॉल कसा करावा*
ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी असलेल्या नंबर वरून *18002703600* या नंबर वर कॉल करून सांगितल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून आपले संपूर्ण नाव घटना,घटनेचे ठिकाण,स्पष्ट व नागरिकांना समजेल अशा शब्दात रेकॉर्ड करावे. संदेश *25 सेकंदा पेक्षा जास्त मोठा नसावा*
*यासारख्या घटनांचे कॉल स्वीकारले जात नाहीत* –
वैयक्तिक संदेश,लग्न सत्यनारायण पूजा,वर्षश्राद्ध,वाढदिवसाच्या शुभेच्छा,घरातील किरकोळ वाद,बांधावरील भांडणे,बिबट्या फक्त दिसणे,धार्मिक किंवा जातीय निर्माण करणारे संदेश सामाजिक शांतता धोक्यात आणणारे संदेश इत्यादी किंवा असा आशय असणारे कोणतेही संदेश स्वीकारले जात नाहीत, *_एकाच घटनेचा दोनदा संदेश स्वीकारला जात नाही_*
*ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर आपल्या मोबाईल मध्ये 18002703600 AAA HELP किंवा अअअ मदत याच नावाने सेव्ह करावा…*
टीप–ग्रामसुरक्षा यंत्रणेचा आपल्या गावात महिन्यातून किमान वापर 3 वेळा पेक्षा जास्त वापर होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी. जेणेकरून एखादी आपत्कालीन घटना घडल्यास गावकऱ्यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल करावा हे लक्षात येईल.आणि त्या कुटुंबाला मदत मिळेल..