ब्रेकिंग

नाशिक महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा

नाशिक – प्रतिनिधी प्रसाद राजोळे

नाशिक प्रतिनिधी – जिल्ह्यात देान दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. नाशिक शहरालापाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९९. ४१ टक्के भरले असा अंदाज आहे. त्यामुळे सकाळपासून या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

गंगापूर धरणाचे पाणलेाट क्षेत्र असलेल्या भागात तसेच त्र्यंबकेश्वर येथे जोरदार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणाचे सर्व दरवाचे उघडण्यात आले आहेत. तर सायंकाळी आठ हजार क्युसेक प्रवाह वाढण्यात येणार आहे. गंगापूर धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पुर पातळीत वाढ झाली असून नदीकाठची दुकाने आणि अन्य व्यवहार बंद ठेण्यात आले आहेत. नदीपात्रातील दुतेांड्या मारोतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहरात मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे