कोपरगाव बाजार समितीत कांदा लिलाव दोन सत्रात व्हावे – मा. सभापती सुनिल देवकर
कोपरगाव बाजार समितीत कांदा लिलाव दोन सत्रात व्हावे – मा. सभापती सुनिल देवकर
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव दोन सत्रात होणे बाबतचे निवेदन सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माजी सभापती सुनील भाऊ देवकर यांनी बाजार समितीचे थोरात साहेब यांना दिले आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या बाजार समितीत कांद्याचे लिलाव फक्त सकाळच्या एका सत्रात सुरू आहे परंतु सध्या बाजार भाव आणि आवक दोन्ही वाढल्यामुळे कांदा लिलाव हा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात करण्यात यावा
त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी कमी होईल व शेतकऱ्यांची अडचण ही होणार नाही सध्याच्या परिस्थितीत कांद्याला कुठेतरी चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडे अतिशय थोडासा कांदा शिल्लक असल्याने रिक्षा किंवा ट्रॅक्टर जे साधन मिळेल . त्यात शेतकरी शासकीय नियमानुसार तो घेऊन येत आहे ग्रामिण भागात वहातुकीची साधने कमी असल्याने कांदा मार्केट ला पाठवता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे मालाला भाव असुनही तो वेळेवर मार्केटला जात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तरी लिलाव दोन सत्रात केल्यास शेतकरी कांदा वेळेवर मार्केटला नेऊ शकतो आणि त्याला दोन पैसे हो मिळतील त्या अनुषंगाने वरील सर्व बाबींचा विचार करता दोन सत्रात लिलाव व्हावा अशी मागणी माजी सभापती सुनिल देवकर यांनी निवेद्वारे केली आहे.
तसेच शिरसगाव वादाच्या पाश्र्वभुमीवर दुपारी दीड वाजता लिलाव चालू केल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे तरी तुमचे जे काही वाद असतील ते मार्केट कमिटी प्रशासन व व्यापारी यांनी संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा,शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अश्या शब्दात देवकर यांनी व्यापाऱ्यांची कानउघडणी केली.आजच्या या शिरसगाव प्रकरणाचा सर्व शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
या प्रसंगी मा.सभापती सुनील भाऊ देवकर, जनार्दन रोहम, अनिकेत डफळ ,प्रतीक औताडे, शरीफ तांबोळी, रविभाऊ पिंपरकर ,रमेश अंबिलवादे ,सोन्याबापु कुऱ्हाडे, दत्तात्रय भोसले, योगेश पाचोरे, वाल्मिक कदम ,सतीश गोसावी, भाऊसाहेब कळसकर, शमशु शेख ,अंबादास देवकर आणि बाबासाहेब जगताप व सर्व शेतकरी रिक्षा ट्रॅक्टर मालक उपस्थित होते