शब्द सुमने मंच मंगळवेढा प्रथम वर्धापन दिन साजरा
🌹शब्द सुमने मंच मंगळवेढा प्रथम वर्धापन दिन साजरा🌹
खंडू भोसले ( धायटी ) मा. अॅड. नंदकुमार पवार यांचे अध्यक्षतेखाली , मा. सोमनाथजी आवताडे व डॉ. ज्योती कांबळे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सदर प्रसंगी वरील मान्यवरांचा सत्कार शाल हार व सन्मानचिन्ह देऊन मंचच्या वतीने करण्यात आला . हा कार्यक्रम नगर वाचनालय , करमरकर सभाग्रहात ५० ते ६० रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
त्या वेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष हेमंत रत्नपारखी यांनी आपल्या प्रस्तावनेत, शब्द सुमने मंचच्या स्थापनेची व ध्येय धोरणांची माहिती दिली. भविष्यात मंच ऑफलाईन कार्यक्रम घेऊन स्थानिक साहित्यीका बरोबर महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील साहित्यीकांना व कविंना व्यासपीठ मिळवून देण्या बाबत प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले . मंगळवेढ्याची ओळख ही संतभूमी बरोबर साहित्य भूमी अशी व्हावी या साठी सर्व साहित्यीकांनी व सर्व साहित्य मंचनी एक मेकाशी सुसंवाद ठेवत प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले .आज शब्द सुमने मंचच्या माध्यमातून मंगळवेढ्याचा नावलौकीक संपूर्ण महाराष्ट्र भर नाही तर गोवा, कर्नाटक , मध्य प्रदेश व सिंगापूर पर्यंत पोहचला आहे. मंच वरती २५० सदस्य आपल्या साहित्य सेवेचे योगदान देत आहेत व त्या सर्व साहित्यीकांना हा मंच आपल्या हक्काचा आहे असे वाटते हेच या मंचचे यश आहे . एक व्यापक व सर्व समावेशक विचार धारा घेऊन मंचची वाटचाल चालू असल्याचे सांगीतले.
सदर कार्यक्रमात गेले वर्षभर राबवलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली . मंचचे सचिव अनिल केंगार यांनी चित्रकाव्य उपक्रमाची , मंचचे कोषाध्यक्ष हरिप्रसाद देवकर यांनी साप्ताहिक ऑनलाईन उपक्रमाची, मंचचे अध्यक्ष संतोष रायबान यांनी व्हि.डी.ओ. काव्य स्पर्धेची , मंचच्या उपाध्यक्षा विद्या माने यांनी चारोळी उपक्रम, अष्टाक्षरी काव्य स्पर्धा व गझल स्पर्धेची व सदस्य विजय खाडे यांनी गझले बदल व गझल कार्यशाळेच्या उपक्रमा विषयी सविस्तर माहिती दिली.
अक्षर गंधचे संस्थापक अध्यक्ष मा.दिगंबर भगरे व नामवंत कवि मा. शिवाजी सातपुते यांचा सत्कार मा. अॅड. नंदकुमार पवार यांचा हस्ते शाल हार व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला . तर मंचचे सदस्य मा.मोहन जुंधळे ( गुरुजी ) यांनी रोख ५००० / रु देऊन शिवाजी सातपुते यांचा गौरव केला .
डॉ. ज्योती कांबळे यांनी आपल्या मनोगतात, मंच ला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत आपल्पा ओघवत्या शैलीत आपले साहित्यीक विचार व्यक्त केले . मा. सोमनाथजी आवताडे यांनी मंचच्या कार्याचे कौतुक करत मंचच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या . तर अॅड. नंदकुमार पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत मंगळवेढ्याला मिळालेल्या साहित्यीक वारशाचा परामर्श घेत मंगळवेढ्याच्या चालू व भावी चळवळी विषयी आपले विचार व्यक्त केले व सर्व साहित्यीकांना ” जलो मत बराबरी करो ” असा प्रेमळ सल्ला दिला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचन कवयित्री मंगल बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन कवि धनंजय माने यांनी केले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.