ब्रेकिंग

शब्द सुमने मंच मंगळवेढा प्रथम वर्धापन दिन साजरा

🌹शब्द सुमने मंच मंगळवेढा प्रथम वर्धापन दिन साजरा🌹

खंडू भोसले ( धायटी ) मा. अॅड. नंदकुमार पवार यांचे अध्यक्षतेखाली , मा. सोमनाथजी आवताडे व डॉ. ज्योती कांबळे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सदर प्रसंगी वरील मान्यवरांचा सत्कार शाल हार व सन्मानचिन्ह देऊन मंचच्या वतीने करण्यात आला . हा कार्यक्रम नगर वाचनालय , करमरकर सभाग्रहात ५० ते ६० रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

त्या वेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष हेमंत रत्नपारखी यांनी आपल्या प्रस्तावनेत, शब्द सुमने मंचच्या स्थापनेची व ध्येय धोरणांची माहिती दिली. भविष्यात मंच ऑफलाईन कार्यक्रम घेऊन स्थानिक साहित्यीका बरोबर महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील साहित्यीकांना व कविंना व्यासपीठ मिळवून देण्या बाबत प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले . मंगळवेढ्याची ओळख ही संतभूमी बरोबर साहित्य भूमी अशी व्हावी या साठी सर्व साहित्यीकांनी व सर्व साहित्य मंचनी एक मेकाशी सुसंवाद ठेवत प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले .आज शब्द सुमने मंचच्या माध्यमातून मंगळवेढ्याचा नावलौकीक संपूर्ण महाराष्ट्र भर नाही तर गोवा, कर्नाटक , मध्य प्रदेश व सिंगापूर पर्यंत पोहचला आहे. मंच वरती २५० सदस्य आपल्या साहित्य सेवेचे योगदान देत आहेत व त्या सर्व साहित्यीकांना हा मंच आपल्या हक्काचा आहे असे वाटते हेच या मंचचे यश आहे . एक व्यापक व सर्व समावेशक विचार धारा घेऊन मंचची वाटचाल चालू असल्याचे सांगीतले.

सदर कार्यक्रमात गेले वर्षभर राबवलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली . मंचचे सचिव अनिल केंगार यांनी चित्रकाव्य उपक्रमाची , मंचचे कोषाध्यक्ष हरिप्रसाद देवकर यांनी साप्ताहिक ऑनलाईन उपक्रमाची, मंचचे अध्यक्ष संतोष रायबान यांनी व्हि.डी.ओ. काव्य स्पर्धेची , मंचच्या उपाध्यक्षा विद्या माने यांनी चारोळी उपक्रम, अष्टाक्षरी काव्य स्पर्धा व गझल स्पर्धेची व सदस्य विजय खाडे यांनी गझले बदल व गझल कार्यशाळेच्या उपक्रमा विषयी सविस्तर माहिती दिली.

अक्षर गंधचे संस्थापक अध्यक्ष मा.दिगंबर भगरे व नामवंत कवि मा. शिवाजी सातपुते यांचा सत्कार मा. अॅड. नंदकुमार पवार यांचा हस्ते शाल हार व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला . तर मंचचे सदस्य मा.मोहन जुंधळे ( गुरुजी ) यांनी रोख ५००० / रु देऊन शिवाजी सातपुते यांचा गौरव केला .

डॉ. ज्योती कांबळे यांनी आपल्या मनोगतात, मंच ला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत आपल्पा ओघवत्या शैलीत आपले साहित्यीक विचार व्यक्त केले . मा. सोमनाथजी आवताडे यांनी मंचच्या कार्याचे कौतुक करत मंचच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या . तर अॅड. नंदकुमार पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत मंगळवेढ्याला मिळालेल्या साहित्यीक वारशाचा परामर्श घेत मंगळवेढ्याच्या चालू व भावी चळवळी विषयी आपले विचार व्यक्त केले व सर्व साहित्यीकांना ” जलो मत बराबरी करो ” असा प्रेमळ सल्ला दिला.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचन कवयित्री मंगल बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन कवि धनंजय माने यांनी केले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे