झाडांचे संवर्धन सर्वांची जबाबदारी – ग्रा.वि अधिकारी विजय पाटील
झाडांचे संवर्धन सर्वांची जबाबदारी – ग्रा.वि अधिकारी विजय पाटील
कोपरगाव प्रतिनिधी : ‘झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन ब्राम्हणगावचे ग्राम विकास अधिकारी यांनी केले.
ब्राम्हणगाव स्मशान भूमीत कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने एकूण २० नारळाचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत असून, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या व हिरवागार करण्याच्या उद्देशातून या भागात वृक्षारोपण करण्यात येते त्यासाठी ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे आम्हाला सहकार्य मिळते, असे मत ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी व्यक्त केले.