ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने साजरी केली मानवतावादी दिवाळी
ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने साजरी केली मानवतावादी दिवाळी
कोपरगाव प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने एकल महिलांना दिवाळी फराळ व नित्योपयोगी वस्तू देऊन मानवतावादी दिवाळी साजरी केली.
ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ म्हणाले, खरा निरोगी समाज शिक्षकच घडवू शकतो. महिलांच्या बाबतीत समाज कितीही उदारमतवादी बोलत असला तरी वास्तव वेगळे आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या स्रियाना कुटुंबाचे प्रेम मिळत नाही. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य अजून बिघडते. त्या रस्त्यावर येतात. अशा स्त्रिया समाजाच्या तावडीत सापडल्या तर त्या अत्याचाराला बळी पडतात. त्यांना आधार देण्याचे काम संस्था करीत आहे. आज ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने ज्याना कोणी ही नाही आशा महिलांना फराळ व नित्योपयोगी वस्तू देऊन दिवाळी साजरी केली. या महिलांना आर्थिक मदतीपेक्षा समाजाचे असे मानसिक बळ वाढवणारे प्रेम अपेक्षित आहे
यावेळी ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी सोमनाथ डफाळ ,गणेश आसने ,गणेश फापाळे ,गणेश बर्डे ,नानासाहेब शिंदे,अमोल भुजबळ ,गणेश पळसकर व ग्रामस्थ उपस्थित होते