शाळा सुरू करण्याआधी शासनाने सर्व विद्यार्थ्यांना विमा सरंक्षण द्यावे : शैलेश साबळे
शाळा सुरू करण्याआधी शासनाने सर्व विद्यार्थ्यांना विमा सरंक्षण द्यावे : शैलेश साबळे
कोपरगाव प्रतिनिधी : सोमनाथ डफाळ
गेल्या दीड वर्षांपासून कोविड विषाणूंनी अक्षरशः कहर केलेला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद ठेवलेली आहेत. तत्पूर्वी, गेल्या तीन-चार दिवसांपासून शाळा व महाविद्यालय सुरू करण्याच्या चर्चा जोर धरू लागलेल्या असताना कोपरगाव येथील रसराज मेडिकलचे संचालक शैलेश साबळे यांनी पहिली ते बारावी वर्ग सुरू करण्याआधी शासनाने सर्वच विद्यार्थ्यांचा विमा काढावा अशी मागणी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकात साबळे यांनी म्हंटले आहे की,अद्यापही कोविडचे संकट सुरू आहे. या कोविड मुळे जसनसमान्य अतिशय मेटा कुटीला आला असून त्यांची आर्थिक चक्रे पूर्णपणे थांबली आहे दोन वेळेचं जेवायचं कस हा यक्ष प्रश्न काही नागरिकांन समोर उभा ठाकला आहे आणि जर यातच कोरोना झाला तर त्याचा कडे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पैसे कुठून येणार हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यातच राज्य शासन शाळा व महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे किंबहुना सर्व पालक व शिक्षकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नसल्याने पालक व विद्यार्थ्यांत प्रचंड भीती आहे. तसेच शिक्षण विभागही अजून सुरू करावे की ना या संभ्रमात आहे. त्यामुळे शासनाने पहिली ते बारावी वर्ग सुरू करण्याआधी सर्व विद्यार्थ्यांचा विमा काढावा, जेणेकरून सर्वाना विमा कवच मिळेल ज्यामुळे काही अंशी का होईना पालकांना दिलासा मिळेल अशी सूचना रसराज मेडिकलचे संचालक शैलेश साबळे यांनी केली आहे. हा निर्णय शासनाने घेतल्यास राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असेही नमूद केले आहे.