काँग्रेस पक्षाच्या वतीने १५ जागा लढविणार – अबूबकर मणियार
काँग्रेस पक्षाच्या वतीने १५ जागा लढविणार – अबूबकर मणियार
कोपरगाव प्रतिनिधी : मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऊर्जा मंत्री डॉ. नितीनजी राऊत साहेब, प्रदेश अध्यक्ष मा. नानासाहेब पटोले, मा.आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरात अ.जा. विभागामार्फत २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती आदित्य कॉम्पुटर या ठिकाणी मा, महिला जिल्हा अध्यक्षा सौ सविताताई विधाते व कोपरगाव शहराध्यक्ष रविंद्र साबळे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अबूबकर मणियार हे होते. महात्मा गांधी जयंतीतीचे औचित्त साधून अनुसूचित जाती विभागाच्या वतीने नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे बाबूराव पवार, छबुराव शिंगाडे, संजय आव्हाड व त्यांच्या सोबत आठ ते नऊ कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये (अ. जा. विभागात ) प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली. प्रदेश अध्यक्ष मा. नानासाहेब पटोले यांनी कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून सर्वानी तयारीला लागा असे आवहान केले. आदेशाचे पालन करून अध्यक्ष स्थानावरून बोलतांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने (अ. जा. विभागामार्फत)१५ जागेवर उमेदवार लढणार असल्याचे वक्तव्य अबूबकर मणियार यांनी व्यक्त केले. शेवटी अंतिम निर्णय पक्ष श्रेष्टी घेतील ते मान्य राहील. यावेळी जिल्हा अध्यक्षा सविताताई विधाते, मंगलाताई, रत्नमाला त्रिभुवन शेख सर, आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी युसुबभाई शेख, मयूर गोरे, राजेंद्र पोटे, किशोर शेलार, अलत्मश शेख, पवार, युनूस शेख, यादवराव त्रिभुवन, राजेंद्र घोडेराव, संजीव पाईक, आदी. पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र साबळे यांनी केले. तर आभार मयूर गोरे यांनी मानले.